Description
क्रांतिसूर्य’ ही कादंबरी मराठा साम्राज्याचे शेवटे शासक असलेल्या यशवंतराव होळकरांच्या ‘न भूतो न भविष्यती’ अशा देदीप्यमान कामगिरीवर आधारलेली आहे. ते मध्य भारतातील अहिल्याबाईंच्या महेश्वर संस्थानाचे स्वयंभू, स्वतंत्र शासक होते. ते त्या वेळी जगज्जेता नेपोलियनच्या समकालीन होते आणि जे काम नेपोलियन आपल्या तलवारीच्या जोरावर इंग्रजांच्या विरूद्ध तिथे करत होता, तेच काम यशवंतराव आपल्या तलवारीच्या सामर्थ्यावर इथे करत होते; पण हे यशवंतरावांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की, त्यांना समजून घेणारा एकही राजा त्या वेळेस नव्हता.





Reviews
There are no reviews yet.