Description
प्रत्येकच माणसात देव आणि दानव दोघांचा अंश असतो. कोणतीही दुर्घटना माणसाची जणू परीक्षाच घेत असते. अशा प्रसंगातच माणसात किती देवत्व आहे आणि किती दानवत्व आहे, ते समजून येते. दुर्घटनेच्या काळातच माणसातलं देवत्व किंवा दानवत्व खऱ्या अर्थाने बाहेर येतं. आग ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. एका धार्मिक कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांचा आगीत होरपळून जीव गेला होता. त्या दुर्घटनेत लोकांचं काय झालं असेल, त्यांची स्थिती कशी झाली असेल, त्याचा विचार यात केला आहे. एखादी दुखद घटना माणसाला कसं हादरवून टाकते, ही त्याची गोष्ट आहे. ही वेदनेची गोष्ट आहे. माणसाच्या नातेसंबंधांचे पदर उलगडवून दाखवणारी ही गोष्ट आहे. एखाद्या दुखद घटनेचा माणसाचा असणारा संबंध सांगणारी ही गोष्ट आहे. ही माणसातल्या देवत्वाची आणि दानवत्वाची गोष्ट आहे.


![Ramayan : Khel Jeevansanchitacha- PART 4 / रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग चार ] किष्किंधा कांड खंबीर राहा - मनात श्रद्धा आणि भीतीवर मात | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/07/Ramayana_04_Stand_Strong_Marathi_F-180x278.jpg)



Reviews
There are no reviews yet.